Posts

आजी ते माजी प्रवास😊

Image
आजी ते माजी प्रवास 😊  आठवतो का तो दिवस आई च्या नावाने आकांताने रडणारे आपण... ती छोटी पाण्यची बॉटल, ते शाळेच्या ड्रेस वर लहान असं रुमाल आणि आई तू बाहेर बस अस सांगणारे आपण...आई ५ मिनिट बाहेर बसायची अन् आपल्याला शाळेत बसवून कधी हुल देऊन निघुन जायची कळत देखील नव्हतं 😂... तेव्हा आपल्याला शांत करणारी दुसरी आई अर्थात आपली शिक्षिका❤️ आई तिच्याच भरोसे आपल्याला सोडून जायची....त्या दिवसापासून आपल शाळेशी तेथील शिक्षकांशी नात जोडलं गेलं...काय बरोबर ना???  (बरं एक विचारू??? मी शाळेत जाताना रडलेली की नाही  हे मला नाही आठवत तुम्हाला आठवत का ???  आठवत असेल तर नक्की कमेंट करून सांगा...😬🤭 ) बालवाडी पासून ते सातवी पर्यंत आपण शिक्षकांच्या सावलीखाली होतो. कुठली जबाबदारी नव्हती करियर नावाचा तो प्रेशर नव्हता. जीवन कसं एकदम सुंदर चालू होतं. मित्रमैत्रिणींशी एक घट्ट नातं झालं शिक्षक पूर्णतः आई-वडील वाटू लागले. किंबहूना शिक्षकांमध्ये देखील एक मैत्रीच नात निर्माण झालं अस म्हणायला हरकत नाही. मग काय आठवी ते दहावीचा प्रवास हा जरा जडतर वाटायला लागतो. खरी सुरवात होते अभ्यासाला हे तीन वर्ष अशी असतात ना जिथं विद्या

खेळांच्या शोधात...

खेळांच्या शोधात... ते खेळ तरी काय खेळ असायचे.... विटीदांडू,गोट्या,लगोरी, लपाछपी,सोनसाखळी,चारचिठ्ठी,पकडापकडी,डोंगर का पाणी,मामाच पत्र ,भोवरा, कांदाफोडी,कब्बडी,खो-खो... काय हे खेळ ह्या खेळांची ना मज्जाच काहीसी वेगळी,अशी अनेक खेळ जी आपण लहानपणी खेळायचो अर्थात आताही खेळतो पण कधीतरी अन् तो कधीतरी कधी उगवेन हे माहित नाही... असो पण हे सारे खेळ आपण जस जस मोठे होत गेलो तस तस हे सर्व खेळ आपण बालपणाला देऊन पुढे निघून आलो... काय मं खेळांची नाव वाचून बालपणात गेलात का ???  जशी वार्षिक परीक्षा संपली कि मुलांच्या अंगात ह्या सर्व खेळाचं भूत संचारायच, ती मे महिन्याची सुट्टी अन् हे सारे खेळ जणू एक घट्ट मैत्रीच करून बसायचे...👬🏻👭🏻 हरवलात पुन्हा जुन्या आठवणीत...😁😁 असो पण हे सर्व खेळ फक्त खेळ नव्हत तर आपल्या मुलांची शारीरिक, बौद्धिक, मानसिक क्षमता वाढवण्यासाठी मदत करणारी खेळ होते. माझ्या मते तरी हे खेळ मुलांना हार पत्कारायला शिकवायचे. ह्या मैदानी खेळामुळे मुलांना व्यायामची साथ मिळायची कारण त्या काळात जीम असा प्रकार नव्हता त्या काळात फक्त अन् फक्त खेळ...परंतू आता मात्र ह्यातले बरेचसे खेळ हे फक्त शिक्षणा

शिक्षणाचा बाजार...

शिक्षणाचा बाजार... शिक्षण म्हणजे तरी नेमक काय??? शिकून शहाणे होणे म्हणजे शिक्षण??? पण आपण नक्की शहाणे झालो का??? हा प्रश्न स्वत:चा स्वत:ला विचारून पहा, बघा काय उत्तर मिळत ते... शिक्षणचा बाजार हा शीर्षक देण्यामागाच कारण अस की, जस आपण आता आपल्या रूढी, परंपरा विसरत चाललोय तस आपण आपल्या शिक्षणाच्या जुन्या पद्धती विसरत चाललोय. सध्या आताच्या काळात सर्व ऑनलाइन शिक्षणावर जास्त भर दिला जातो.अनेक प्रसार माध्यमांद्वारे शिक्षण दिल जाते. म्हणून विध्यार्थी घर बसल्या शिक्षण घेतात.पण त्या विध्यार्थीचं काय ज्याच्यापर्यंत मोबाइल, इंटरनेट जाऊ शकत नाही.त्या खेडयातील विध्यार्थीचं काय ज्याची मोबाइल,इंटरनेट विकत घेण्यासाठी पण हवे तितके पैसे नसतील.  अश्या विध्यार्थीसाठी सोई-सुविधा पुरवतात का??? चला एखाद्यावेळी त्या सोई-सुविधा पुरवल्या जातातही पण त्या नेमक्या त्याच्यापर्यंत पोहचतात का??? ह्या सगळ्यामध्ये भीषण बाब अशी की अनेक लोक शिक्षणाचा धंदा करतात,शिक्षण हे विकलं गेलय डोनेशन च्या नावाखाली,त्यामुळे कित्येक हुशार आणि गरीब विध्यार्थीचा जीव घोटला जातो.मी वर खेड्यातील विध्यार्थीचं उल्लेख केला कारण अनेक शेतकरी स्व

इंटरनेटची कमाल..

इंटरनेटची कमाल...  इंटरनेट.. आजच्या जगात तू किती जवळचा आहेस याची कल्पना देखील तू नाही करू शकणार.......खरंच खाता पिता उठता बसता प्रवासात सतत सगळीकडे तू सोबत असतोस. तुझ्यासोबत तुझा तो खास मित्र मोबाइल अन् तो कम्प्युटर...  असो... आजची पब्लिक फुल्ल प्रेमात आहे राव तुझ्या,सतत तुझा वापर असतो... तुझा जन्म झाला तेव्हा लोकांकडे तो साधा मोबाइल  असावा. तिथून तुझी हळूहळू क्रेझ वाढली ती अजून तशीच आहे अन् पुढेही अशीच राहील,आता तर स्मार्ट मोबाइल आलेत म्हणून आता तुझ्याविणा करमेना अस झालय. तुझ्यामुळे आम्ही पूर्ण जगाची माहिती अशी सहज आमच्यापाशी ठेवतो.तुझ्यामुळे लोकांची काम खूप सोप्पी झाली आहेत. सध्या ह्या कोरोना च्या काळात तू खूप मोठा हातभार लावला आहे अस मला वाटत कारण तुझ्यामुळे आम्ही आमच्या कुटुंबाशी आमच्या नातेवाईकांशी कनेक्टेड राहिलो...ह्या लॉकडाऊन मध्ये सर्व कामे ही “वर्क फ्रॉम होम” देण्यात आली.त्या सर्वाना तुझी खूप मदत झाली.  तुझ्यामुळे आम्हाला घर बसल्या सर्व काही मिळून जात रे... खरंच कमाल आहेस रे तू... तू नसला तर काय होईल रे आमच. बापरे... नको नको अस विचार ही नको... ह्या सगळ्यासाठी मी तुझा वापर करण

वाढदिवस...🎂

ज्या दिवशी आपली आई कळा सोसून रडत रडत हसत असते तो दिवस म्हणजे  वाढदिवस... वाढदिवस म्हणजे एखाद्या जिवाची,वस्तूची किंवा कार्याची सूरूवात केलेला दिवस. प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी हा दिवस येतोच, येतोच काय  देवाने हा दिवस सर्वांच्या आयुष्यात दिलेला असतो. मनुष्यजात  हा दिवस करते.काहींच्या जीवनात प्रत्येक वर्षी हा दिवस मोठ्या थाटाने साजरा होतो तर काहींच्या नाही असो ज्यांच्या जीवनात हा दिवस साजरा होतो ते त्यांच नशिब.  जग बदलते तस चालीरीती ही बदलतात.अलीकडच्या काळात  सामाजिक माध्यमा व्दारे (SOCIAL MEDIA )नवनवीन यूक्तीचा वापर करून खूप सुंदर पध्दतीने शुभेच्छा दिल्या जातात थोडाफार अश्या प्रकारेही आपण आपला आपण वाढदिवस साजरा करतो. हिंदू संस्कृती नूसार एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस असेल तर त्या व्यक्तीची आरती ओवाळली जाते,त्याला कुंकवाचा टिळा लावून  घरचे मोठे त्याला आशीर्वाद देतात त्या व्यक्तीला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या जातात व तोंड गोड करण्यासाठी एखादा गोड पदार्थ त्याला खाण्यासाठी दिला जातो आजच्या  काळात वाढदिवस व्याख्या पूर्णतः बदललेली आहे, वाढदिवस म्हटल की मित्रांनी किंवा नातेवाईक यांन

मैत्रीण…

  मैत्रीण …👫        आजची सुरवात दोन ओळीच्या कवितेपासून... “मैत्री ही स्त्री किंवा पुरुष या वर अवलंबून नसते मैत्री हे अस नात आहे जे भेदभावपेक्ष्या निष्ठावंत व्यक्ती सोबत केलेली असते ” प्रत्येक पुरूषाच्या आयुष्यात एकतरी मैत्रीण असतेच मग ति आई , बहीण कुणीही असू शकते .                                               माझी पण एक मैत्रीण आहे ति ना माझी बहीण , ना आई , ना माझ्या का ॕ लेज मधली न माझ ्या अॉफिस मधली परंतु जवळची मैत्रीण आहे . अगदी लहानपणापासून तारू ण्यात पदार्पण करण्याच्या वया पासून माझ्यावर मनापासून प्रेम करणारी परंतु नात्याने फक्त माझी मैत्रीण असणारी , माझ्या खदखदून हसण्यामागील काळजी व माझ्या स्मिथ हास्या मागील दु;ख ओ ळखणारी माझी मैत्रिण चार चौ घां मध्ये मुद्दाम माझ्या बाजूला येऊन खांद्यावर हात ठेवून बसणारी , फिरायला जातांना आवर्जून माझ्याच गाडीवर बसणारी , फोटो काढताना मुध्दाम जवळ येऊन हात पकडनारी , एखाद्या मुली बद्दल माहीती विचारली असता मुद्दाम काहीतरी बोलून "ति तूझ्या लायकनाही आपण दूसरी कोणती बघू"असे बोलणारी माझी मैत्रीण.                              

पिढीतंर

पिढीतंर अंतर हा फक्त एका वस्तूत,गोष्टीत,चार माणसांमध्ये नसतो. आपण सहज बोलून जातो, चार ठिकाणी वाचतो "सुरक्षित अंतर ठेवणे".ह्या अंतराचे बरेच अर्थ असतात. त्यापैकी एक महत्त्वाचा अंतर म्हणजे दोन पिढ्यांमधील अंतर.. पिढी अंतर (generation gap) म्हणजे तरी नेमक काय??? दोन पिढ्यांमधील अंतर एक पिढी जर आज जन्माला आली असेल तर दूसरी कमीत कमी १० वर्षाने जन्माला येने ह्यालाच पिढी अंतर (generation gap)असे म्हटले जाते. अनेक वेळा आपण एका लहान अन् मोठ्या व्यक्तींमधील वाद किंवा असमंजसपणाला पिढी अंतराचे(generation gap) कारण देतो,पण हे कारण बरोबर आहे का? चला तर मग आपण या विषयावर  पूढे काही अभ्यास करु...                  एका कुटुंबामध्ये  सर्व सदस्य ऐकाच पिढी (generation)चे असातात का??? आई-वडील व मूले याच्या मध्ये कमीत-कमी २० ते २५ वर्षांचा फरक असतोच मग सुसंस्कृत व लहान परंतु समंजस मुलांचे त्यांच्याशी जमत नाही का??? जमत जमवून घ्याव... कारण त्या ठिकाणी आई-वडील मोठे आहेत ते आपल्या हिताची काळजी करतील असे मूल मान्य करतात तसेच मुले अजून लहान आहेत अस आई-वडील समजून चालतात त्यामुळेच त्यांच्यातील हे अंत